यंदाच्या मान्सूनकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. खरीप हंगामाची तयारी सुरू असताना पाऊस नेमका कधी सुरू होणार आणि पेरणीसाठी योग्य वेळ कोणती असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार यंदा मान्सून वेळेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभाग म्हणजेच India Meteorological Department (IMD) च्या ताज्या अंदाजानुसार २०२६ चा नैऋत्य मान्सून अंदमान-निकोबार परिसरात या आठवड्याच्या अखेरीस सक्रिय होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सून साधारण मे अखेरपर्यंत दाखल होऊ शकतो आणि त्यानंतर महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात प्रवेश होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात पाऊस कधी येऊ शकतो? :
सध्याच्या अंदाजानुसार:
कोकण व दक्षिण महाराष्ट्र → ५ ते १० जून दरम्यान
मराठवाडा व विदर्भ → १० ते १८ जून दरम्यान
पश्चिम महाराष्ट्र → ८ ते १५ जून दरम्यान चांगल्या पावसाची शक्यता
यावर्षी सुरुवातीला उष्णतेची तीव्रता जास्त असल्यामुळे काही भागात प्री-मान्सून वादळी पावसाची शक्यता देखील वाढली आहे.
पेरणीची योग्य तारीख कोणती :
शेतकऱ्यांनी फक्त पहिल्या पावसावर पेरणी न करता सलग ७५-१०० मिमी प्रभावी पाऊस झाल्यानंतरच मुख्य पेरणी करणे सुरक्षित मानले जाते.
सोयाबीन :
योग्य कालावधी: १५ जून ते ३० जून
लवकर पेरणी केल्यास उगवण आणि कीड समस्या वाढू शकतात
तूर :
योग्य कालावधी: २० जून ते १० जुलै
मिश्र पीक पद्धतीत फायदा संभवतो
कापूस :
योग्य कालावधी: १० जून नंतर
जमिनीत पुरेशी ओल असल्याची खात्री आवश्यक
मका :
योग्य कालावधी: १५ जूनपासून पुढे
हवामान खात्याचा नवीन अंदाज काय सांगतो :
- देशातील काही भागात यंदा पाऊस सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे
- एल निनोचा प्रभाव पुढील महिन्यांत वाढू शकतो
- तरी सुरुवातीचा मान्सून वेळेत सक्रिय होण्याचे संकेत आहेत
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला :
- घाईत कोरड्या जमिनीत पेरणी करू नका
- हवामान विभागाचे ७ दिवसांचे अपडेट नियमित पाहा
- बीज प्रक्रिया करूनच पेरणी करा
- पावसाचा स्थिर अंदाज आल्यावरच मोठ्या प्रमाणात बियाणे वापरा
अधिकृत हवामान अपडेटसाठी :
टीप : हवामान अंदाज वेळेनुसार बदलू शकतो. शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान विभाग, कृषी तज्ज्ञ आणि कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच पेरणी व शेती व्यवस्थापनाचे निर्णय घ्यावेत. येथे दिलेली माहिती सामान्य अंदाजावर आधारित आहे.
- कांदा प्रश्नावर दिल्ली दरबारात मोठी बैठक; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?महाराष्ट्रातील कांदा दर घसरल्यामुळे राज्य सरकारचे शिष्टमंडळ दिल्लीमध्ये Amit Shah यांची भेट घेतली. कांदा खरेदी, निर्यात आणि शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाबाबत मोठी चर्चा. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
- देशात मक्याची मागणी वाढणार: २०३० पर्यंत ७.२ कोटी टनांचे लक्ष्य! शेतकरी बांधवांसाठी मोठी संधीफिक्की-येस बँक अहवालानुसार, इथेनॉल आणि पशुखाद्य उद्योगांमुळे २०३० पर्यंत भारतात मक्याची देशांतर्गत मागणी ७.२ कोटी टनांवर पोहोचणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही कशी मोठी संधी आहे, जाणून घ्या.
- खत व्यवस्थापन पूर्ण मार्गदर्शक | योग्य खत वापरून उत्पादन वाढवाखत व्यवस्थापन म्हणजे काय? कोणत्या पिकाला कोणते खत किती द्यावे, NPK म्हणजे काय, युरिया आणि DAP वापरताना कोणती काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती.
- शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार! रासायनिक खतांसोबत इतर औषधं सक्तीने विकल्यास दुकानदाराचा परवाना होणार रद्द; कृषी विभागाचा कडक इशाराखरीप हंगामात खत खरेदी करताना कृषी सेवा केंद्र चालक दुसरी औषधे सक्तीने गळ्यात मारतात का? आता सरकारने घेतला मोठा निर्णय, दुकानदाराचा परवाना थेट रद्द होणार. वाचा कृषी विभागाचा नवीन नियम आणि तक्रार कशी करायची.
- आल्याची लागवड नियोजन | बेड पद्धत, खत व्यवस्थापन आणि पाणी नियोजनआल्याची (आदरक) लागवड कशी करावी? जमीन निवड, बेड अंतर, बियाणे प्रक्रिया, खत व्यवस्थापन आणि पाणी नियोजन याबद्दल सविस्तर माहिती.